scorecardresearch
Wednesday, 24 December, 2025

टॉप बातम्या

महम्मद युनूस यांची भारतासाठीचे अमेरिकेचे राजदूत गोर यांच्याशी चर्चा

बांगलादेशचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी भारतासाठी अमेरिकेचे नियुक्त राजदूत आणि दक्षिण व मध्य आशियासाठी विशेष दूत सर्जिओ गोर यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणात बांगलादेशातील हिंसाचाराच्या घटनांसाठी माजी पंतप्रधान शेख हसीना यांना जबाबदार धरले.

अंतर्गत वादांमुळे महायुती, महाविकास आघाडीची काही जागांवर हातमिळवणी

पुणे आणि पिंपरी चिंचवडसारख्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अशाच प्रकारच्या युतीची शक्यता आधीच तपासली जात आहे. रविवारच्या निकालांमुळे या प्रयोगाला बळ मिळेल.

तेलंगणा पंचायत निवडणुकांमधील काँग्रेसच्या यशाचा मुख्यमंत्री रेवंत रेड्डींकडून गौरव

पोटनिवडणुकांमध्ये मुख्य विरोधी पक्ष असलेल्या बीआरएसकडून दोन महत्त्वाच्या विधानसभा जागा हिसकावून घेतल्यानंतर, सत्ताधारी काँग्रेसने तेलंगणा पंचायत निवडणुकांमध्येही आपली विजयी मालिका कायम ठेवली असून, राज्यात सुमारे 60 टक्के सरपंच पदे जिंकली आहेत. काँग्रेस-समर्थित उमेदवारांनी 7 हजार 527 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला.

‘हिंदू मंदिरे देवतांची आणि भक्तांचीच, हिमाचल प्रदेश हायकोर्टाचा योग्य निर्वाळा’

हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात एक ऐतिहासिक निकाल दिला होता, ज्यामध्ये असे म्हटले होते की मंदिर निधी सरकार वापरु शकत नाही किंवा त्याचा गैरवापर करू शकत नाही. न्यायमूर्ती विवेक सिंग ठाकूर आणि राकेश कैंथला यांच्या खंडपीठाने असा निर्णय दिला की "मंदिर निधी देवतेचा आहे, राज्याचा नाही".

‘धुरंधर’च्या निमित्ताने: कठोर भाष्य करणारा चित्रपट हीच’ सॉफ्ट पॉवर’

'धुरंधर' दाखवून देतो की कठोर भाष्य करणारा सिनेमा हीच सॉफ्ट पॉवर आहे आणि पाकिस्तान हेच निर्विवादपणे लक्ष्य आहे. जर 'पठाण'ने पुराणमतवादी आणि उदारमतवादी दोघांनाही लपायला जागा दिली असेल, तर 'धुरंधर' तशी कोणतीही सवलत देत नाही. आदित्य धरने दांभिकतेचा तो पडदा फाडून टाकला आणि जखमेवर मीठ चोळले.

‘स्मॉल इज ब्युटीफुल’: माणूस महत्त्वाचा!

1973 मध्ये लिहिलेलं एक पुस्तक, ज्याच्यावर खूप टीका झाली. तेच पुस्तक, आज पन्नास वर्षांचा कालावधी उलटल्यावर सामाजिक, आर्थिक, राजकीय, जागतिक परिस्थितीत प्रचंड बदल घडून आल्यावर परत एकदा उपयोगी पडू शकते यात लेखकाची दूरदृष्टी म्हणायची? प्रगत जगाचे अपयश म्हणायचे? का तेव्हा पुस्तकातून शिकायची वेळ आली नव्हती असे समजायचे?

ईस्ट इंडिया कंपनीतील नोकरीमुळे कसे पडले सांकलिया कुटुंबाचे नाव ‘किल्लावाला’?

'द अदर मोहन' मध्ये, अमृता शाहने 1900 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात तिच्या आजोबांच्या मुंबई ते दक्षिण आफ्रिकेच्या प्रवासातून भारतीय स्थलांतराची कहाणी सांगितली आहे.

कोचीन स्वतंत्र राज्य व्हावं यासाठी का दिला ज्यूंनी लढा?

एमके दास कोचीन या केरळमधील छोट्या बंदर शहराचा इतिहास सांगतात. डच, पोर्तुगीज, ब्रिटिश राजवटीपासून ते आजच्या कम्युनिझमपर्यंत.

आर्मेनियन व्यापारी असा झाला दारा शिकोहचा शिक्षक, हादरवून सोडले मुघल साम्राज्य

‘अ ड्रॉप इन द ओशन: द स्टोरी ऑफ माय लाइफ’ मध्ये सय्यदा हमीदने तिच्या आयुष्याला अर्थ देणारे अनेक प्रसंग शेअर केले आहेत.

आर्यांना ‘नक्षत्र’ प्रणालीचे देणे लाभले हडप्पा संस्कृतीकडून

देवदत्त पट्टनाईक यांचे 'अहिंसा : 100 रिफ्लेक्शन्स ऑन द हडप्पा सिव्हिलायझेशन' हे पुस्तक हडप्पा संस्कृतीच्या खुणा आजही आपल्या संस्कृतीत कशाप्रकारे दिसून येतात याकडे लक्ष वेधते.
भारतात परदेशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा कितीतरी जास्त विद्यार्थी परदेशी विद्यापीठांमध्ये जात आहेत, असे नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. नीती आयोगाच्या उपाध्यक्षा सुमन बेरी यांनी सोमवारी 'भारतातील उच्च शिक्षणाचा आंतरराष्ट्रीयीकरण अहवाल' प्रसिद्ध केला.
उत्तर प्रदेशमध्ये भाजप एका अनपेक्षित मुद्द्यावरून चिंतेत आहे—तो म्हणजे मतदार याद्यांची विशेष सखोल पडताळणी (एसआयआर) प्रक्रिया. सूत्रांनी 'द प्रिंट'ला सांगितले की, सुधारित मतदार यादीतून भाजप समर्थकांचा मोठा गट वगळला गेल्याबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चिंता व्यक्त केली आहे.