पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन देशांच्या दौऱ्याच्या समारोपानिमित्त ते आज ओमानमध्ये आहेत. भारत आज, गुरुवारी ओमानसोबत मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करणार आहे. या भेटीदरम्यान व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, संरक्षण, तंत्रज्ञान, कृषी, संस्कृती आणि दोन्ही देशांतील लोकांमधील संबंध यांसारख्या क्षेत्रांमध्ये अनेक महत्त्वाचे करार अपेक्षित आहेत.
बांगलादेशातील ढाका येथील भारतीय दूतावासाच्या परिसरात अतिरेकी घटकांमुळे निर्माण होणारी संघर्षाची परिस्थिती आणि बांगलादेशातील बिघडत चाललेल्या सुरक्षा परिस्थितीबद्दल तीव्र चिंता व्यक्त करण्यासाठी भारताने बुधवारी बांगलादेशचे उच्चायुक्त रियाझ हमीदुल्ला यांना पाचारण केले.
नॅशनल सिटिझन पार्टी (एनसीपी) चे नेते हसनत अब्दुल्ला यांनी भारतविरोधी वक्तृत्व अधिक तीव्र केले असून, बांगलादेश अस्थिर झाल्यास 'सेव्हन सिस्टर्स'ला वेगळे पाडण्याची आणि ईशान्येकडील फुटीरतावाद्यांना आश्रय देण्याची धमकी दिली आहे.
निवडणूक प्रक्रिया विस्कळीत करण्याचा इरादा असलेल्या अवामी लीगच्या नेत्यांना भारत आश्रय देत आहे, हा ढाकाचा दावाही परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळून लावला. बांगलादेशमध्ये 12 फेब्रुवारी 2026 रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मस्कतला होणारा आगामी दौरा दोन्ही देशांसाठी 'अत्यंत महत्त्वाचा आणि धोरणात्मक' आहे, असे ओमानचे भारतातील राजदूत इस्सा अल शिबानी यांनी 'द प्रिंट'ला सांगितले. येथे आयोजित 'सुहार इन्व्हेस्टमेंट फोरम 2026' च्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने 'द प्रिंट'शी ते बोलत होते.
संरक्षण, ऊर्जा, तंत्रज्ञान, अवकाश, विश्वासार्ह पुरवठा साखळी या क्षेत्रात सहकार्य वाढवणे आणि जागतिक तंत्रज्ञान नेता म्हणून भारताच्या उदयाला पाठिंबा देणारे अमेरिका-भारत सहकार्याचे मूल्य वाढवणे हे अमेरिकेचे उद्दिष्ट आहे, असे अमेरिकेच्या राजकीय व्यवहार विभागाचे अवर सचिव अॅलिसन हूकर यांनी मंगळवारी दिल्लीत भारतीय परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्याशी झालेल्या बैठकीत सांगितले.
पूरग्रस्त श्रीलंकेला पाकिस्तानकडून पाठवण्यात आलेल्या अन्नाच्या पॅकेटसची मुदत संपलेली आढळून आली. त्यामुळे पाकिस्तानच्या मदतीच्या राजनैतिक प्रयत्नांना धक्का बसला. चक्रीवादळ दितवामुळे भूस्खलन आणि पुरामुळे होरपळणाऱ्या देशाला मदत करण्यासाठी हे अन्न पाठवण्यात आले होते.
संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी सांगितले, की भारत अतिरिक्त एस-400 ट्रायम्फ हवाई संरक्षण प्रणाली खरेदी करण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भेटीदरम्यान कोणतीही घोषणा केली जाणार नाही.
अरुणाचल प्रदेशातील भारतीय महिलेला शांघाय विमानतळावरून प्रवास करताना थांबवून 18 तासांहून अधिक काळ रोखून ठेवल्याबद्दल भारताने बीजिंग आणि नवी दिल्ली या दोन्ही ठिकाणी चीनविरुद्ध कडक निषेध नोंदवला आहे.
नवी दिल्ली आणि ओटावा यांच्यातील संबंध पुन्हा सुधारण्यास सुरुवात झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारत आणि कॅनडाने मुक्त व्यापार करारासाठी (एफटीए) वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शविली. दक्षिण आफ्रिकेतील जी 20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मार्क जे. कार्नी यांची भेट झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली.
गेल्या वर्षी एका अध्यादेशाद्वारे आपले अधिकार बदललेले न्यायालय, आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण-बांगलादेश (आयसीटी-बी) मधील न्यायालयीन नियुक्त्यांवरचे प्रश्न, बचाव पक्षाचे वकील ज्यांनी त्यांच्या अशिलाशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही आणि हितसंबंधांचा संभाव्य संघर्ष या सर्वांमुळे माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे भारतातून प्रत्यार्पण हा वादग्रस्त व गोंधळाचा विषय झालेला आहे.
नवी दिल्लीच्या वायू प्रदूषणाशी लढाई सुरू असताना, चीनच्या भारतातील प्रवक्त्या यू जिंग यांनी दोन्ही देशांच्या वायू प्रदूषण संकटातील साधर्म्य सांगणारी एक पोस्ट एक्सवर लिहिली आहे. बीजिंगने या प्रदूषणावर मात कशी केली, हे सांगून भारताला सहाय्य करण्यास चीन तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.