scorecardresearch
Monday, 8 September, 2025
घरराजकारण

राजकारण

‘कुणाल कामरावर कारवाई केली जाईल’: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कामरा यांनी एका सेटवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'देशद्रोही' म्हटले होते. दरम्यान, मुंबईत शिवसेनेच्या सदस्यांनी कार्यक्रमस्थळाची तोडफोड केल्यानंतर विरोधी पक्षांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

‘केंद्राने कॉलेजियम प्रणाली रद्द करण्यासाठी प्रयत्न केले’, महुआ मोईत्रांचा आरोप

दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या वादानंतर, महुआ यांनी केंद्रावर कॉलेजियम प्रणाली रद्द करण्यासाठी पाया घातल्याचा आरोप केला. टीएमसी खासदार महुआ मोईत्रा म्हणतात की ‘जसे निवडणूक आयोगाला कमकुवत केले गेले आहे, तसेच एनजेएसीसारखे काहीतरी पूर्ण सरकारी नियंत्रणासह परत आणण्यासाठी आणि कॉलेजियम प्रणाली रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत’.

बिहार काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व कन्हैयाच्या पदयात्रेपासून अलिप्त?

राज्यातील अनेकांसाठी, 'पलायन रोको नोकरी दो' यात्रा ही कन्हैयाच्या बिहारच्या राजकारणात पुन्हा प्रवेशासाठी एक व्यासपीठ आहे. 2019 मध्ये संसदीय निवडणुकीत पराभव झाल्यानंतर तो मुख्यतः दिल्लीतच होता.

‘भाषिक द्वेष अर्थहीन, त्रिभाषा धोरण आवश्यक’: एन. चंद्राबाबू नायडू

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी हे विधान त्यांचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी हिंदीला विरोध करणाऱ्या तमिळनाडूच्या राजकारण्यांना 'संस्कृतचा गैरवापर' केल्याचा आरोप करून फटकारल्यानंतर काही दिवसांनी केले आहे.

विहिंप, बजरंग दलाच्या निदर्शनांमुळे औरंगजेब कबरीवरून राजकारण तापले

नागपूरमध्ये, विहिंप आणि बजरंग दलाच्या निदर्शनांमुळे शहरातील महाल परिसरात दोन गटांमध्ये हाणामारी झाली, जमावाने वाहनांची तोडफोड केली आणि दगडफेक केली. नितीन गडकरी यांनी शांततेचे आवाहन केले.

‘गोध्रा घटनेपूर्वी गुजरातमध्ये 250 हून अधिक मोठ्या दंगली, त्यानंतर नाही’: पंतप्रधान

अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ आणि पॉडकास्टरशी बोलताना मोदी म्हणाले की 2002 च्या दंगलींसाठी त्यांच्या राजकीय विरोधकांनी त्यांच्या सरकारला दोष देण्याचा प्रयत्न केला असला तरी, न्यायालयांनी त्यांना निर्दोष ठरवले आहे.

‘संघाला समजून घेणे इतके सोपे नाही’: पंतप्रधान नरेंद्र मोदी

"बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) माझ्या जीवनाला आकार दिला. या संघटनेने प्रथम राष्ट्रीय भावना मनात रुजवली आणि मला जीवनाचा उद्देश मिळवून दिला" असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी लेक्स फ्रिडमन पॉडकास्ट मध्ये केले.

‘भारताचे ‘मीठ’ खाणाऱ्यांनी औरंगजेबाची स्तुती थांबवावी’ : योगी आदित्यनाथ

"भारताचे 'मीठ' खाणाऱ्या लोकांनी त्यांची डीएनए चाचणी करून घ्यावी, म्हणजे त्यांना त्यांचा डीएनए भारतीय असल्याचे आढळेल", असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी लखनौ येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र ऑर्गनायझर आणि पंचजन्य यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात भारतीय मुस्लिमांना उद्देशून म्हटले.

भाजप केंद्र सरकारविरुद्धचे ‘आप’ काळातील खटले रद्द करणार, केंद्र-दिल्ली संबंध सुधारणार?

राष्ट्रीय राजधानीत 'आप'च्या पहिल्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच कायदेशीर संघर्ष सुरू झाला. केंद्र आणि उपराज्यपालांविरुद्ध किमान अर्धा डझन खटले सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत.

किरोडी लाल बंड, भ्रष्टाचाराचे आरोप यांमुळे राजस्थान भाजप चर्चेत

गेले काही महिने राजस्थान भाजप अनेक वादग्रस्त गोष्टींमुळे चर्चेत आहे. विरोधी पक्ष याचा फायदा उठवत आहेत.

उत्तर तेलंगणावर भाजपची पकड मजबूत, आता हैदराबाद नगरपालिका निवडणुकांवर लक्ष

2023 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून पराभव पत्करल्यानंतर भाजप तेलंगणात आघाडीच्या विरोधी शक्ती म्हणून स्वतःला स्थान देण्याचा प्रयत्न करत असताना, एमएलसीच्या ताज्या निवडणुकांचे निकाल आले आहेत.

निलंबित आमदार अबू आझमींचा राहुल सोलापूरकरांवर निशाणा

निलंबित आमदार अबू आझमींनी राहुल सोलापूरकर यांच्या शिवाजी महाराजांवरील वक्तव्याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, 'मी सरकारला विचारू इच्छितो की राज्यात दोन वेगवेगळे कायदे आहेत का? अबू आझमींसाठी एक, राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकरांसाठी दुसरा?'