शुक्रवारी रात्री जाहीर झालेल्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसचे वर्चस्व दिसून आले. आता तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी काँग्रेस आणि राज्य सरकारमध्ये आपले स्थान मजबूत केले आहे. शुक्रवारी रात्री जाहीर झालेल्या निकालांमध्ये काँग्रेसने बहुसंख्य नगरपालिका आणि महानगरपालिका जिंकल्या आहेत.
पशुपालन पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी 14 काँग्रेस आमदारांच्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या 15 दिवसांच्या दौऱ्याच्या योजनेतून आता राजकीय वाद निर्माण झाला आहे. कर्नाटक सरकारच्या खर्च आणि प्राधान्यांवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
तब्बल चार वर्षांच्या कालावधीनंतर, भायखळा येथील महापौर बंगला मुंबईच्या नव्या महापौर रितू तावडे यांच्यासाठी सजवला जात आहे. बंगल्याचे आता नूतनीकरण आणि देखभाल सुरू आहे आणि बीएमसीच्या मते, तो लवकरच तयार होईल.
केरळमधील सत्ताधारी एलडीएफ सरकारने या आठवड्यात मोठ्या रकमेचे पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू केले आहेत. केरळमध्ये विधानसभा निवडणुका जवळ येत असताना बुधवारी मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांनी 800 कोटी रुपयांच्या उपक्रमांचे उद्घाटन केले.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि काँग्रेसमधील दरी वाढत चालली आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) नेते विरोधी अजित पवार गटात विलीन होण्यास उत्सुक आहेत, त्यामुळे महाविकास आघाडी फुटण्याच्या मार्गावर आहे.
बारापैकी आठ जिल्हा परिषदा आणि 125 पैकी 51 पंचायत समिती निवडणुकीत आघाडी घेत, भाजप महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष राहिला आहे, ज्यामुळे हे स्पष्ट होते, की पक्ष केवळ शहरी भागातच नाही तर ग्रामीण महाराष्ट्रातही तितकाच मजबूत आहे.
केरळमधील आगामी निवडणुकांसाठी आपल्या प्रचाराला सुरुवात करताना, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफने सत्ताधारी सीपीआय(एम) पक्षावर 'मतांसाठी जातीय ध्रुवीकरण करण्याकरिता संघ परिवाराच्याच मार्गावर चालत असल्याबद्दल' जोरदार टीका केली.
भारतीय जनता पक्षाने शनिवारी, घाटकोपरच्या तीन वेळा नगरसेविका राहिलेल्या रितू तावडे यांना मुंबईच्या महापौरपदासाठी आपल्या उमेदवार म्हणून घोषित केले आहे. यामुळे चार दशकांहून अधिक काळानंतर शहराच्या महानगरपालिकेत आपला दुसरा महापौर बसवण्याची संधी पक्षाला मिळाली आहे.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर का दिले नाही, यावर स्पष्टीकरण देताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुरुवारी सांगितले की, 'देशाच्या लोकशाही परंपरेला बाधा पोहोचवणारी 'अप्रिय' घटना घडण्याची भीती असल्याने त्यांनी पंतप्रधानांना त्यांचे प्रथागत भाषण टाळण्याची विनंती केली होती'.
विरोधकांवर, विशेषतः काँग्रेसवर, 'आपल्याला मृत पाहण्याची इच्छा असल्याचा' आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले की, ‘मोदी तेरी कब्र खुदेगी’ ही केवळ एक घोषणा नाही, तर ते त्यांच्या मनात माझ्याबद्दल असलेल्या दीर्घद्वेषाचे प्रतीक आहे'.
बासष्टवर्षीय मेईतेई भाजप आमदार युम्नाम खेमचंद सिंग, हे मणिपूरचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. मणिपूर राज्य सध्या एका आव्हानात्मक टप्प्यातून जात आहे. 2024 च्या मध्यावर, मणिपूर हिंसाचाराने पेटले होते, तेव्हा खेमचंद यांनी एका बैठकीत एन. बिरेन सिंह यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्यास सांगितले होते.
सुनेत्रा पवार यांनी त्यांचे पती अजित पवार यांच्या जागी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तीन दिवसांनी, महाराष्ट्र सरकारने त्यांची पुणे आणि बीड जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती केली आहे. अजितदादा या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री होते.