scorecardresearch
Friday, 13 February, 2026
घरदेशअजित पवार विमान अपघाताबाबत रोहित पवारांकडून अनेक शंका उपस्थित

अजित पवार विमान अपघाताबाबत रोहित पवारांकडून अनेक शंका उपस्थित

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाल्यानंतर तेरा दिवसांनी, त्यांचे पुतणे रोहित पवार यांनी सार्वजनिकरित्या चार्टर एअरक्राफ्ट ऑपरेटर व्हीएसआर एव्हिएशनवर गंभीर आरोप केले आहेत.

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाल्यानंतर तेरा दिवसांनी, त्यांचे पुतणे रोहित पवार यांनी सार्वजनिकरित्या चार्टर एअरक्राफ्ट ऑपरेटर व्हीएसआर एव्हिएशनवर गंभीर आरोप केले आहेत. यात विमानाच्या उड्डाणयोग्यतेवर, शेवटच्या क्षणी क्रूमध्ये झालेला बदल, पायलटचे वर्तन आणि अधिकृत तपासाची संथ गती यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मुंबईच्या वाय. बी. चव्हाण सेंटर येथे झालेल्या सविस्तर पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी आरोप केला, की ‘हा अपघात अपघात नसून अनेक चुकांचा परिणाम आहे. ‘हा केवळ अपघात नसून पद्धतशीर निष्काळजीपणामुळे झालेली दुर्घटना आहे’,असे ते म्हणाले. अजित पवार 28 जानेवारी रोजी सकाळी 8.45 वाजता बारामती विमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात असलेल्या व्हीएसआर एव्हिएशनद्वारे चालवल्या जाणाऱ्या लिअरजेट विमानात होते. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) त्यानंतर चौकशी सुरू केली आहे, तर प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) ने प्राथमिक निष्कर्ष जाहीर केले आहेत. रोहित पवार यांनी दावा केला की, विमान आणि विमानातील कर्मचाऱ्यांना शेवटच्या क्षणी बदलण्यात आले. त्यांच्या मते, मूळ कर्मचाऱ्यांची माहिती देणारे ईमेल प्रस्थानाच्या काही काळापूर्वी बदलण्यात आले होते, ज्यामध्ये पायलट सुमित कपूर आणि सह-वैमानिक शांभवी पाठक यांना शेवटच्या क्षणी नियुक्त करण्यात आले होते.

“कर्मचारी सकाळी 7 वाजता विमानतळावर पोहोचले, परंतु पायलट, सुमित कपूर, काही तासांपूर्वीच हाँगकाँगहून आंतरराष्ट्रीय विमानाने पोहोचले होते.” रोहित पवार यांनी आरोप केला. कपूर यांच्याकडे पुरेशा विश्रांतीसाठी वेळ होता का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये अल्कोहोल वारंवार दिले जाते, त्यामुळे संभाव्य नशेबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली. “विमानाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी अल्कोहोल किंवा ब्रेथ टेस्ट दिली होती का?” पवार यांनी असा आरोप केला की, पायलटने नुकतीच लांब पल्ल्याची उड्डाणे पूर्ण केली असली तरी अशा कोणत्याही तपासण्या केल्या जात नाहीत. रोहित पवार यांनी कपूर यांच्या लिअरजेट विमानातील अनुभवावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, की ‘पायलट लिअरजेट मॉडेलवर कॅप्टन म्हणून मर्यादित तास होते आणि प्रामुख्याने व्यावसायिक ऑपरेशन्समध्ये त्यांनी फक्त सह-वैमानिक म्हणून काम केले होते’. त्यांनी कपूर यांच्या कथित ट्रॅक रेकॉर्डचा उल्लेख केला आणि असा दावा केला की त्यांच्यासोबत नांदेडला जाताना यापूर्वी दुसऱ्या एका राजकीय नेत्याला वाईट अनुभव आला होता. ‘या संदर्भात कोणतीही औपचारिक तक्रार सार्वजनिक केलेली नसली तरी, ही घटना चिंताजनक आहे जी ऑपरेटरने विचारात घ्यायला हवी होती’, असे म्हणणे रोहित यांनी मांडले आहे.

धावपट्टीची निवड आणि ऑडिओ रेकॉर्ड

पवार यांनी उपस्थित केलेल्या मुख्य प्रश्नांपैकी एक म्हणजे बारामती विमानतळावर धावपट्टी 29 ऐवजी धावपट्टी 11 वर उतरण्याचा प्रयत्न करण्याच्या पायलटच्या निर्णयाशी संबंधित आहे. “रनवे 29 हा सपाट आहे आणि लँडिंगसाठी अधिक सुरक्षित मानला जातो. धावपट्टी 11 ही कुप्रसिद्ध टेबलटॉप धावपट्टी आहे. जर 29 साठी लँडिंग परवानगी आधी मागितली गेली असेल, तर पायलटने काही क्षणांपूर्वी अचानक धावपट्टी 11 वर उतरण्याची परवानगी का मागितली?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. रोहित पवार यांनी कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंग आणि पुश-टू-टॉक (पीटीटी) डेटावरबद्दलही प्रश्न उपस्थित केले. “पीटीटी सिस्टम बटण दाबल्यावर सर्व आवाज रेकॉर्ड करते. पाठक या ओह शिट, ओह शिट असे म्हणताना ऐकू आले असले, तरी त्या क्षणी पायलटचा कोणताही आवाज येत नाही,” असे पवार म्हणाले. कपूर पूर्णपणे सतर्क होते किंवा प्रतिसाद देण्यास सक्षम होते का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

याव्यतिरिक्त, त्यांनी आरोप केला, की विमानाचा ट्रान्सपॉन्डर (एअर ट्रॅफिक कंट्रोल रडार सिस्टीममध्ये एक युनिक ओळख कोड आणि उंची डेटा स्वयंचलितपणे प्रसारित करणारे उपकरण) आघात होण्यापूर्वी शेवटच्या मिनिटात बंद करण्यात आला होता, परंतु या हालचालीचे स्पष्टीकरण आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले. “क्रॅश होण्यापूर्वी ट्रान्सपॉन्डर का बंद करण्यात आला?” त्यांनी विचारले.

स्वतंत्र चौकशीची मागणी

पवार यांनी डीजीसीए आणि पीआयबीच्या अहवालांमधील विसंगतींकडे लक्ष वेधले, हवाई वाहतूक नियंत्रणाशी संपर्क साधण्याच्या रेकॉर्ड केलेल्या वेळेत आणि अपघातात विसंगती असल्याचा दावा केला. त्यांनी कोणती आवृत्ती अचूक आहे आणि परस्परविरोधी माहिती का जारी करण्यात आली आहे, याबद्दल स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. त्यांनी फॉरेन्सिक टीमने केलेल्या कथित विलंबावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि ते म्हणाले, “फॉरेन्सिक टीम इतक्या उशिरा अपघातस्थळी का पोहोचली? सीआयडीला तपासाची जबाबदारी देण्यात आली असताना, ते परिश्रमपूर्वक आणि जलद तपास करण्यास पुरेसे सक्षम दिसत नाहीत.” स्वतंत्र आणि पारदर्शक चौकशीची मागणी करत रोहित पवार म्हणाले, “हे भावनिक प्रश्न नाहीत. हे तांत्रिक प्रश्न आहेत ज्यांची प्रामाणिक उत्तरे मिळायला हवीत.”

‘द प्रिंट’शी बोलताना, व्हीएसआरचे मालक कॅप्टन विजय कुमार सिंग म्हणाले: “26 तारखेला कॅप्टन सुमित कपूर संध्याकाळी कर्णालाहून मुंबईला परतले आणि 27 तारखेला त्यांनी अजिबात उड्डाण केले नाही. याचा अर्थ असा, की फ्लाइट ड्युटी वेळेच्या मर्यादेचा कोणताही प्रश्न नव्हता. दोघांनाही योग्य विश्रांती देण्यात आली होती.” अपघाताच्या दिवसाबद्दल बोलताना सिंग म्हणाले, “विमानात जाण्यापूर्वी, त्यांची श्वासोच्छवासाची चाचणी झाली, ज्यामध्ये व्हिडिओ आहे, सर्वकाही आहे. ही एक अतिशय, अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे, एक असा अपघात ज्यामध्ये आपण मौल्यवान जीव गमावले आहेत. ही दुर्घटना आमच्या विमानात घडली याचे मला खूप दुःख आहे.” डीजीसीएने असे म्हटले आहे, की चौकशी सुरू आहे आणि उड्डाण डेटा, कॉकपिट रेकॉर्डिंग आणि देखभाल नोंदींचे संपूर्ण विश्लेषण केल्यानंतरच निष्कर्ष काढले जातील.

रोहित पवार यांनी तपास पूर्ण होईपर्यंत आणि सर्व शंका दूर होईपर्यंत व्हीएसआर एव्हिएशनला दिलेले सर्व करार आणि सेवा तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. रोहित यांनी कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर, ज्याला सामान्यतः ब्लॅक बॉक्स म्हणून संबोधले जाते, ते सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. “तपास आतापर्यंत खूप हळू चालला आहे आणि काही लोकांना तो पुढे नेण्यात रस नाही”, असेही त्यांनी म्हटले आहे. रोहित म्हणाले की, अजित पवारांच्या मुलांनाही अशाच शंका भेडसावत आहेत, म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते अमोल मिटकरी त्यांच्या पक्षाच्या वतीने दिल्लीला गेले होते. “प्रत्येकाचे प्राधान्यक्रम वेगळे असतात. आमचे प्राधान्य आमच्या शंका दूर करणे आहे, जे सुनेत्रा काकू, पार्थ आणि जय यांनाही हवे आहे,” असे ते म्हणाले.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments