scorecardresearch
Tuesday, 9 September, 2025
घरदेशमहाकुंभमेळ्यात हरवण्याची भीती नको, ‘एआय’ तुमच्या दिमतीला!

महाकुंभमेळ्यात हरवण्याची भीती नको, ‘एआय’ तुमच्या दिमतीला!

बारा वर्षांनंतर महाकुंभाचे पुनरागमन झाले असून यावेळच्या कुंभमेळ्याचे एक खास तांत्रिक वैशिष्ट्य आहे. 'हरवले-सापडले'च्या डिजिटल केंद्रांपासून ते सीसीटीव्ही देखरेख आणि एलईडी डिस्प्लेपर्यंत, प्रयागराज प्रशासन सर्व तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देत आहे.

प्रयागराज, उत्तर प्रदेश: बारा वर्षांनंतर महाकुंभाचे पुनरागमन झाले असून यावेळच्या कुंभमेळ्याचे एक खास तांत्रिक वैशिष्ट्य आहे. ‘हरवले-सापडले’च्या डिजिटल केंद्रांपासून ते सीसीटीव्ही देखरेख आणि एलईडी डिस्प्लेपर्यंत, प्रयागराज प्रशासन जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्यासाठी येणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी तंत्रज्ञानावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.“हा महाकुंभ परंपरा आणि तंत्रज्ञान, इतिहास आणि आधुनिक मार्गांचा संगम आहे,” असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

महाकुंभाच्या तयारीवर देखरेख करणाऱ्या प्रयागराजमधील प्राधिकरणाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, 13 जानेवारीपासून सुरू होऊन 26 फेब्रुवारीपर्यंत नदीकाठावर होणाऱ्या महाकुंभात अंदाजे किमान 40 कोटी लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. कुंभमेळा दरवर्षी भरतो, तर महाकुंभ हा दर 12 वर्षांनी होणारा एक प्रमुख हिंदू धार्मिक उत्सव आहे. यामध्ये भाविक गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती यांचे संगम असलेल्या पवित्र त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी गर्दी करतात. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 4 हजार हेक्टर मेळा परिसरात सुमारे 1 हजार 500 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. हे कॅमेरे कंट्रोल अँड कमांड युनिटशी जोडलेले आहेत.

“कंट्रोल अँड कमांड युनिटमध्ये प्रत्येक विभागाचे नियुक्त अधिकारी असतील – मग ते अग्निशमन असो, पाणी असो किंवा इतर. काही घडताच, ते वेळेवर प्रतिसाद देण्यासाठी त्यांच्या टीमला सक्रिय करतील,” असे अधिकाऱ्याने पुढे सांगितले. प्रशासनाने आणखी एक तांत्रिक सोय केली आहे ती म्हणजे हरवलेल्या व्यक्तींना शोधण्यासाठी स्थापन केलेली डिजिटल  केंद्रे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या केंद्रांना सक्षम करेल जिथे नवीन युगातील तंत्रज्ञान अधिकाऱ्यांना केवळ सोशल मीडिया अकाउंटवरील व्यक्तींशी बेपत्ता व्यक्तींचे फोटोच जुळवता येणार नाहीत, तर संवाद सुलभ करण्यासाठी इंग्रजी आणि हिंदीमध्ये विविध भाषांमध्ये भाषांतरदेखील मिळेल. “हरवलेल्या लोकांसाठी आणि मुलांसाठी, बेडच्या मूलभूत सुविधांसह एक नियुक्त क्षेत्र तयार करण्यात आले आहे जिथे ते त्यांच्या कुटुंबियांशी पुन्हा संपर्क साधेपर्यंत वाट पाहू शकतात,” असे अधिकारी म्हणाले.

अशी सुमारे 12 केंद्रे उभारण्यात आली आहेत, ती सर्व एलईडी डिस्प्ले स्क्रीनने जोडलेली आहेत. जर एखादा हरवलेला पाहुणा किंवा भाविक सापडला तर त्याचा चेहरा डिजिटल पद्धतीने कॅप्चर केला जाईल आणि मेळाव्याच्या ठिकाणी असलेल्या एलईडी स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल जेणेकरून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांचा शोध घेता येईल.

कुटुंबातील सदस्य या केंद्रांवर तक्रारदेखील दाखल करू शकतात. त्या केंद्रावरून  घोषणा केल्या जातील. “आम्ही याचा प्रयोग केला आणि त्याचा चांगला उपयोग होत आहे. कुंभमेळ्यात आता भाऊ वेगळे होणार नाहीत. आमच्याकडे त्यांना परत आणण्याचे तंत्रज्ञान आहे,” असे वरिष्ठ अधिकाऱ्याने हसत हसत सांगितले. 1970 च्या बॉलिवूड चित्रपटांत मेळ्यात लहानपणी वेगळे झालेली भावंडे आणि ती प्रौढ झाल्यांनतर एकमेकांना पुन्हा भेटणे अशी मध्यवर्ती कल्पना वापरली गेली होती, त्याचा इथे संदर्भ दिला गेला.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments