scorecardresearch
Monday, 8 September, 2025
घरराष्ट्रहिताच्या दृष्टीतूनअसीम मुनीर यांच्या मनात नेमके काय?

असीम मुनीर यांच्या मनात नेमके काय?

काश्मीरचे सामान्यीकरण त्यांच्यासाठी पुन्हा पूर्वपदावर आणावे लागले. भाषण आणि हत्याकांडाच्या दरम्यानच्या आठवड्यात पहलगामचे नियोजन केले गेले नव्हते. त्या नियोजनासाठी अनेक आठवडे लागले असतील. कर्मचाऱ्यांची निवड, जागा, जास्तीत जास्त परिणामाकारक पद्धत, सुटकेचे मार्ग, संरक्षण, सर्वकाही.

पहलगाम प्रकरण आणखी का चिघळले किंवा चिघळवण्यात आले हे कोणीही निश्चितपणे सांगू शकत नाही. आत्ता सध्या, किंवा, अगदी 22 एप्रिलच्या दिवशीही. पण आपण याचे काही सूज्ञ स्पष्टीकरण किंवा विश्लेषण नक्कीच देऊ शकतो. या ‘जिगसॉ’मधील पहिला भाग म्हणजे जनरल असीम मुनीर यांचे 16 एप्रिलचे भाषण. द्विराष्ट्र सिद्धांत आणि इस्लामिक इतिहासावर त्यांनी झोडलेल्या भाषणाला काश्मीरचा संदर्भ होता. आणि “तो आमचा कंठ आहे, आम्ही त्याला विसरणार नाही” असा दावा. काश्मीर हा कंठ (शाह राग) म्हणून पाकिस्तानी अभ्यासक्रमात अनिवार्य विषय असलेल्या पाकिस्तान अभ्यासाचा मानक भास आहे. परंतु वर्षानुवर्षे काश्मीरबद्दल इतक्या मोठ्या आवाजात वचनबद्धता व्यक्त केली गेली नव्हती. मुनीर काश्मीरला पुन्हा अजेंड्यावर आणत असताना मी ते वाचले होते. त्यांच्या स्वरात राग, निराशा आणि धोक्याची घंटा प्रतिबिंबित झाली.

आता चिंता का? तर दुसरी तारीख विचारात घ्या. भारत 19 एप्रिल रोजी दिल्ली आणि श्रीनगर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू करणार होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे उपस्थित असणार होते. खराब हवामानामुळे उद्घाटन पुढे ढकलण्यात आले, पण हे मुळीच महत्त्वाचे नाही. भाषण करताना मुनीरना हे कळले नव्हते. ‘नया काश्मीर’च्या ट्रेंडने एक हतबलता आणली. गेल्या तीन वर्षांपासून जम्मू आणि काश्मीरमध्ये परिस्थिती स्थिर होत आहे; मोठ्या सहभागासह शांततापूर्ण निवडणुका पार पडल्या आहेत. सामान्य परिस्थितीचे प्रतिबिंब 2024 मध्ये पर्यटकांची संख्या 2.95 दशलक्षपर्यंत सातत्याने वाढत आहे आणि 2025 मध्ये 3.2 दशलक्षांपेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे. पर्यटनाच्या विकासासाठी शांतता किती महत्त्वाची आहे हे आपल्याला माहिती आहे. काश्मीरच्या अर्थव्यवस्थेचा तो केंद्रबिंदू आहे. खोऱ्यात आणि विशेषतः पहलगाम आणि आसपासच्या हॉटेल आणि रिसॉर्ट-बिल्डिंगच्या भरभराटीत हे दिसून येते. काश्मिरी तरुण उच्चशिक्षण घेत आहेत, बाहेर जाऊन नव्या संधी शोधात आहेत, आणि देशभरात विविध ठिकाणी काम करत आहेत, ही बाब अत्यंत दिलासादायक आहे. त्यांच्यात शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे.

पर्यटन हा फक्त एक आणि अधिक दृश्यमान पैलू आहे. जवळजवळ आठ दशकांपासून, पाकिस्तानी लोकांनी भारतीय “स्थायिक-वसाहतवाद” किंवा गैर-काश्मिरींच्या आयातीद्वारे खोऱ्यात लोकसंख्याशास्त्रीय बदलाची भीती निर्माण केली होती. आता, काश्मिरी संपूर्ण भारतात जाऊन स्थायिक होत होते. खोऱ्यातील सामान्यतेचे कोणतेही चिन्ह हे पाकिस्तानी स्थापनेचे दुःस्वप्न आहे. 5 ऑगस्ट 2019 नंतर मोठे आणि शाश्वत बंड होण्याची त्यांची अपेक्षा खोटी ठरली आहे. ‘काश्मीर हीच आमची नियती’ असे म्हणणाऱ्या, रावळपिंडीतील जीएचक्यूमधील गर्दीसाठी ते नक्कीच त्रासदायक ठरले असेल. असा युक्तिवाद केला जात आहे, की त्यांचे पूर्ववर्ती जनरल कमर जावेद बाजवा यांनी याच्याशी समेट केला होता. ते पाकिस्तानी लष्करी नेत्यांच्या उत्तराधिकारी फळीतील पहिले नव्हते. त्यापैकी अनेकांनी असाच वास्तववादी आणि परिपक्व दृष्टिकोन अंगिकारला. ते सर्व देशभक्त पाकिस्तानी होते ज्यांना दृढ विश्वास होता, की वास्तव स्वीकारणे त्यांच्या देशाच्या हिताचे आहे आणि भारताशी चांगले संबंध त्यांच्यासाठी हितकर ठरतील. म्हणूनच त्यांनी नियंत्रण रेषेवर (एलओसी) एक मजबूत युद्धबंदी स्थापित करण्यासाठी भारतासोबत ‘बॅकचॅनेल’वर काम केले.

1989 च्या पाकिस्तानच्या रिपोर्टिंग भेटीत, 1974-78 दरम्यान पीएएफ प्रमुख म्हणून काम करणारे एअर चीफ मार्शल झुल्फिकार अली खान म्हणाले की, “माझ्या देशाला जितक्या लवकर हे समजेल की तो लष्करी, राजनैतिक किंवा राजकीय मार्गांनी काश्मीर घेऊ शकत नाही, तितके ते आपल्यासाठी चांगले आहे”. खान हे एक सन्माननीय, व्यावसायिक सैनिक होते ज्यांनी झिया यांनी झुल्फिकार अली भुट्टो यांना उलथवून टाकल्याच्या निषेधार्थ राजीनामा दिला आणि नंतर वॉशिंग्टनमध्ये पाकिस्तानचे राजदूत म्हणून काम केले. इंडिया टुडे मासिकाच्या 31 जानेवारी 1989 च्या अंकात माझ्या लेखात हे उद्धृत केले गेले. तेव्हापासून, आम्ही अनेक उच्च लष्करी कमांडरना हाच मुद्दा मांडताना पाहिले आहे. आता आपण असा अंदाज करू शकतो, की मुनीरना राग आला असावा कारण ते याकडे आत्मसमर्पण म्हणून पाहत होते. पण “आधीच लिहिल्या गेलेल्या नियतीच्या” भावनेच्या विरुद्धदेखील होते. 1986 मध्ये झियाच्या सत्तेच्या शिखरावर नियुक्त झाल्यानंतर, तो पाकिस्तानी वादविवादात कधीकधी वर्णन केलेल्या घटनेचे “झिया भारती” (झिया भरती) असे नामकरण करतील. असे गृहीत धरले जाते, की यातील बरेच अधिकारी अधिक इस्लामी आहेत आणि त्यामुळे शास्त्रीय नियतीवर विश्वास ठेवतात. झियादेखील एक कट्टर इस्लामी होते आणि मौलाना मौदुदी यांचे अनुयायी होते. ते शास्त्रीय नियतीवर विश्वास ठेवणारे होते की नाही, हे आपण सांगू शकत नाही. कारण नियतीने त्यांच्यासाठी काय लिहिले आहे, याची त्यांनी निश्चितच कल्पना केली नव्हती. त्यांच्या इतर कॉर्प्स कमांडरचे विश्लेषण करण्यासाठी माझ्याकडे अद्याप पुरेसे शब्द नाहीत. फक्त ते सर्व ‘झिया भारती’ आहेत.

त्यांनी विशेषतः आकस्मिक परिस्थितीत सत्ता हाती घेतली – हीच अभिव्यक्ती आपण पाकिस्तानी सैन्यात उत्तराधिकारासाठी सुरक्षितपणे वापरतो. बाजवा यांच्या निवृत्तीच्या दोन दिवस आधी ते निवृत्त होणार होते. यामुळे ते प्रमुखपदाच्या वादातून बाहेर पडले होते. पण एका अविश्वसनीय आणि कुतूहलाने भरलेल्या वळणावर, ज्याची तुम्ही फक्त पाकिस्तानमध्ये कल्पना करू शकता, त्यांना निवृत्तीच्या काही दिवस आधी मुख्य म्हणून नियुक्त करण्यात आले. यामुळे पाकिस्तानला दोन दिवसांसाठी दोन सेवारत प्रमुख असण्याचा अभूतपूर्व मान मिळाला.

ते पाकिस्तानच्या ऑफिसर्स ट्रेनिंग स्कूल (ओटीएस)मधून पदवीधर आहेत आणि ते पाकिस्तानच्या प्रसिद्ध लष्करी अकादमीसारखे नाहीत, यातही ते अद्वितीय आहेत. उपखंडीय सैन्यात, ओटीएस शॉर्ट सर्व्हिस कमिशन केलेले अधिकारी निर्माण करते जे कधीही प्रमुख पदापर्यंत पोहोचत नाहीत. मुनीर हे यातील पहिले आहेत. अधिक अनपेक्षित ट्विस्टने त्यांना सर्वोच्च पदासाठी तयार केले. पुलवामा घटना घडली तेव्हा ते आयएसआय प्रमुख होते. काही काळानंतर (आठ महिने सेवा केल्यानंतर), बाजवाने त्यांना पदावरून दूर करून दुसरीकडे नेमण्याचा निर्णय घेतला. त्यांना गुजरानवाला येथे कॉर्प्स कमांडर म्हणून ‘सहायक’ करण्यात आले. हा कारकिर्दीतील एक मोठा बदल होता. पाकिस्तानमध्ये, प्रमुख होण्यासाठी, तुम्हाला कॉर्प्स कमांडर म्हणून काम करावे लागेल. नशिबाने त्यांच्याबाबतीत हा निकष पूर्ण झाला. आता नशिबाने मानवांचे सर्व नियम बदलले आहेत आणि मला या पदावर बसवले आहे आणि हा आपल्यासाठी एक उच्च उद्देश असावा असे त्यांना वाटले असेल. त्यांनी सर्व राजकीय आव्हाने नष्ट केली. इम्रान खान आणि पत्नी बुशराला अनेक गंभीर आरोपांखाली तुरुंगात टाकले. सर्वात लोकप्रिय पक्षाला (इम्रानच्या पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ) निवडणूक लढवण्यापासून रोखून संस्थात्मकरित्या निवडणूक निश्चित केली, अशा प्रकारे विरोधी पक्षाशिवाय ‘निवडून आलेले’ सरकार स्थापन केले. एकही सत्तापालट न करता, मुनीरने रात्री उशिरापर्यंत घटनादुरुस्तीची मालिका राबवून इतर सर्व संभाव्य आव्हानांना तोंड दिले, ज्यामुळे संविधानात बदल झाले. महत्त्वाचा मुद्दा: त्याने लष्करप्रमुखांचा कार्यकाळ तीन वर्षांवरून पाच वर्षांपर्यंत वाढवला.

मानवी मन समजून घेणे हे व्यावसायिक मानसशास्त्रज्ञांसाठी पुरेसे आव्हानात्मक आहे. ते एक अमूर्त विज्ञान आहे. तथापि, जर तुम्ही सर्व तथ्ये एकत्रित केली आणि “माझ्यासाठी नियतीचा काहीएक विशिष्ट हेतू असला पाहिजे” या मानसिकतेवर राहिलात, तर तुम्ही त्या 16 एप्रिलच्या भाषणाचे चांगले भाषांतर करू शकता. काश्मीरचे सामान्यीकरण त्यांच्यासाठी पुन्हा पूर्वपदावर आणावे लागले. भाषण आणि हत्याकांडाच्या दरम्यानच्या आठवड्यात पहलगामचे नियोजन केले गेले नव्हते. त्या नियोजनासाठी अनेक आठवडे लागले असतील. कर्मचाऱ्यांची निवड, जागा, जास्तीत जास्त परिणामाकारक पद्धत, सुटकेचे मार्ग, संरक्षण, सर्वकाही.

आमच्याकडे, म्हणजे ‘द प्रिंट’ विज्ञानविषयक बातम्या ‘कव्हर’ करणाऱ्या सौम्या पिल्लई यांनी दिलेल्या बातमीनुसार यावर्षी फेब्रुवारीमध्ये पहलगाम प्रदेशाच्या ‘उच्च-रिझोल्यूशन उपग्रह’ छायाचित्रांसाठी मॅक्सार टेक्नॉलॉजीजवरील खाजगी ऑर्डरमध्ये लक्षणीय वाढ झाली.  आता यामध्ये लगेच आपण कोणताही संबंध जोडू शकत नाही, परंतु एक लहान, खाजगी पाकिस्तानी कंपनी मॅक्सार भागीदार बनली. पाकिस्तान अणुऊर्जा संस्थेसाठी संवेदनशील तंत्रज्ञान मिळविण्यासाठी निर्यात नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल भूतकाळात दोषी ठरलेल्या एका धूर्त व्यावसायिकाने त्याची स्थापना केली होती. असे योगायोग घडतात का? पहलगाम चित्रांसाठी मॅक्सारला एका महिन्यात 12 ऑर्डर का देण्यात आल्या, गेल्या 12 महिन्यांत सरासरी दोनपेक्षा कमी, तर मार्चमध्ये एकही ऑर्डर का देण्यात आली नाही?

याकडे अशा प्रकारे पहा. जर योजना तयार असेल, जशी ती असायला हवी होती, ती योग्य दिवसाची वाट पाहत होती. जर मुनीरबद्दलचे आमचे वाचन बरोबर असेल, तर दिल्लीहून (मुनीरच्या मते, भारत) काश्मीरला पहिली थेट रेल्वे सेवा सुरू करणे हा काश्मीर खोऱ्याची मनःस्थिती आणि भारताशी त्याचे एकीकरण होण्यात एक मोठा बदल ठरेल. आणि ते त्यांना निष्फळ ठरवायचे होते, कोणतीही किंमत चुकवावी लागली, तरी. अगदी युद्धाचा धोका पत्करूनही.

 

(अनुवाद : तेजसी आगाशे.)

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments