scorecardresearch
Saturday, 14 February, 2026
घरराजकारणभाजप, काँग्रेसचे बोडोलँड टेरिटोरियल रिजनमधील प्रादेशिक शक्तींशी युतीचे प्रयत्न

भाजप, काँग्रेसचे बोडोलँड टेरिटोरियल रिजनमधील प्रादेशिक शक्तींशी युतीचे प्रयत्न

चार जिल्ह्यांमध्ये पसरलेला आणि 15 विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेला बोडोलँड टेरिटोरियल रिजन (बीटीआर) आसाम विधानसभा निवडणुकीपूर्वी एक महत्त्वाचे राजकीय रणांगण म्हणून उदयास आला आहे. भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष संभाव्य युतीसाठी 'बीटीआर'मधील प्रादेशिक शक्तींना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

नवी दिल्ली: चार जिल्ह्यांमध्ये पसरलेला आणि 15 विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेला बोडोलँड टेरिटोरियल रिजन (बीटीआर) आसाम विधानसभा निवडणुकीपूर्वी एक महत्त्वाचे राजकीय रणांगण म्हणून उदयास आला आहे. भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष संभाव्य युतीसाठी ‘बीटीआर’मधील प्रादेशिक शक्तींना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. ही परिस्थिती या प्रदेशातील राजकीय पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झाली आहे. हग्रामा मोहिलारी यांच्या नेतृत्वाखालील बोडोलँड पीपल्स फ्रंटने (बीपीएफ) गेल्या सप्टेंबरमध्ये बोडोलँड टेरिटोरियल कौन्सिल (बीटीसी) निवडणुकीत मोठा विजय मिळवला आणि युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल (यूपीपीएल)-भाजप युतीला सत्तेवरून पायउतार केले. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या आक्रमक निवडणूक प्रचाराला न जुमानता ‘बीपीएफ’ने हा विजय मिळवला.

आता, सरमा बीपीएफ आणि यूपीपीएल या दोन्ही पक्षांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) भागीदार म्हणून कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे, काँग्रेसने यूपीपीएलशी संपर्क साधला आहे, कारण प्रमोद बोरो यांच्या नेतृत्वाखालील पक्ष मोहिलारी यांच्याशी केलेल्या युतीमुळे भाजपवर नाराज आहे, असे काँग्रेसला वाटते. ऑक्टोबरमध्ये, सरमा यांनी बीपीएफचे आमदार चरण बोरो यांना आपल्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून सामील करून घेतले. बीटीआरअंतर्गत असलेल्या 15 जागांव्यतिरिक्त, बोडो समुदायाचे मतदार किमान 10 जागांच्या निकालावर प्रभाव टाकतात. दोन्ही राष्ट्रीय पक्षांना याची जाणीव आहे, ज्यामुळे त्यांनी प्रादेशिक भागीदारांना सोबत घेण्यासाठी आपले प्रयत्न तीव्र केले आहेत. बीटीसी ही 2003 मध्ये संविधानाच्या सहाव्या अनुसूचीअंतर्गत स्थापन केलेली एक स्वायत्त परिषद आहे. कोकराझार, चिरांग, बक्सा आणि उदलगुरी जिल्ह्यांमध्ये पसरलेला ‘बीटीआर’ या परिषदेच्या अखत्यारीत येतो. हग्रामा मोहिलारी यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर संघटना बोडो लिबरेशन टायगर्स फोर्स, केंद्र सरकार आणि आसाम सरकार यांच्यात बोडो करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर बीटीसीची स्थापना झाली. “भाजपला बीपीएफ आणि यूपीपीएल या दोन्ही पक्षांनी एनडीए सहयोगी म्हणून निवडणूक लढवावी, अशी इच्छा आहे, हे काही गुपित नाही. हग्रामा मोहिलारी आणि प्रमोद बोरो यांना (आपसात) समेट घडवून आणण्यास राजी करणे हे आव्हान आहे. सध्या तरी, दोन्ही पक्ष एनडीएमध्येच आहेत,” असे भाजपच्या आसाम युनिटच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

मोहिलारी यांनी आपल्या बाजूने सांगितले आहे की, विधानसभा निवडणुकीदरम्यान यूपीपीएलला एनडीए भागीदार म्हणून कायम ठेवण्याच्या कल्पनेला त्यांचा विरोध नाही. त्यांची अट अशी आहे की, पक्षाला बीटीआरच्या बाहेरून निवडणूक लढवण्यासाठी जागा मिळाव्यात. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये, परिषद निवडणुकीत बीपीएफच्या विजयानंतर, मोहिलारी यांनी दावा केला होता, की ते एनडीएमध्ये परत येतील, परंतु केवळ जर भाजपने यूपीपीएलला सोडले, तरच. तथापि, सरमा यांनी बीपीएफला मंत्रिपदाची ऑफर दिल्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलली. यूपीपीएलच्या सूत्रांनी सांगितले की, पक्षाला बीटीआरच्या बाहेर निवडणूक लढवण्यासाठी जागा देण्याची सूचना ‘अव्यवहार्य’ आहे. याव्यतिरिक्त, सूत्रांनी सांगितले की, काँग्रेसच्या प्रस्तावांवर यूपीपीएलने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. आसामी, कोच-राजबोंगशी आणि बंगाली भाषिक मुस्लिमांसह सुमारे 19 बिगर-बोडो समुदाय परिषदेच्या लोकसंख्येच्या जवळपास 65 टक्के आहेत. बोडो समुदाय हा आसाममधील सर्वात मोठा आदिवासी गट आहे, जो राज्याच्या लोकसंख्येच्या किमान सहा टक्के आहे.

“समजुतींच्या विरुद्ध, बीटीसी निवडणुकीत बीपीएफचा विजय बोडोंनी मोठ्या संख्येने त्यांना मतदान केल्यामुळे झाला नाही, तर मोहिलारी यांच्या या आश्वासनामुळे झाला, की ते बीटीसीच्या अखत्यारीतील भागात ‘अतिक्रमण हटाव मोहीम’ राबवणार नाहीत. जर त्यांनी आता भाजपशी युती केली, आणि यूपीपीएलसोबत आली नाही, तर आम्हाला या प्रदेशात काही जागा जिंकण्याची संधी दिसत आहे,” असे काँग्रेसच्या आसाम युनिटच्या एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘द प्रिंट’ला सांगितले. 2021 च्या आसाम निवडणुकीत, भाजप-यूपीपीएल युतीने बीटीआरच्या पूर्वीच्या 11 जागांपैकी आठ जागा जिंकल्या होत्या. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर, बीटीआरमध्ये चार नवीन विधानसभा जागा जोडल्या गेल्या, ज्यामुळे एकूण जागांची संख्या 15 झाली. भाजपने 2021 मध्ये आसामच्या 126 विधानसभा मतदारसंघांपैकी 60 जागा जिंकल्या होत्या. सरमा यांनीच भाजप आणि यूपीपीएल यांच्यात करार घडवून आणला होता, ज्यामुळे बीपीएफला बीटीसीमधील सत्तेवरून पायउतार व्हावे लागले.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments