scorecardresearch
Thursday, 25 December, 2025
घरराजकारण‘नेपाळवर कोणतेही भाष्य नको’: भाजपचे सर्व नेत्यांना निर्देश

‘नेपाळवर कोणतेही भाष्य नको’: भाजपचे सर्व नेत्यांना निर्देश

भारतीय जनता पक्षाने (भाजप) नेपाळमधील चालू घडामोडींवर भाष्य करणे टाळण्याचे निर्देश त्यांच्या सर्व नेत्यांना, मंत्र्यांना व सोशल मीडिया हँडल्सना दिले आहेत.

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाने (भाजप) नेपाळमधील चालू घडामोडींवर भाष्य करणे टाळण्याचे निर्देश त्यांच्या सर्व नेत्यांना, मंत्र्यांना व सोशल मीडिया हँडल्सना दिले आहेत. बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी ‘नेपाळ भारताचा भाग असता तर देशात शांतता आणि आनंद नांदला असता’ असे म्हटल्यानंतर एका दिवसानंतर हे निर्देश देण्यात आले आहेत.

निर्देशांमध्ये म्हटले आहे की, “आमचे कोणतेही केंद्रीय मंत्री, खासदार, नेते, पदाधिकारी किंवा प्रवक्ते, सोशल मीडिया हँडल नेपाळच्या घडामोडींवर उल्लेख किंवा भाष्य करणार नाहीत. ही एक गंभीर सूचना आहे ज्याचे पालन करणे आवश्यक आहे,” असे भाजपच्या एका नेत्याने ‘द प्रिंट’ला सांगितले. असे कोणतेही भाष्य करण्यापूर्वी भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची परवानगी घेणे आवश्यक आहे, असे त्यात नमूद केले आहे. शिवाय, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालसह सीमावर्ती राज्यांमध्ये तसेच दिल्लीतील नेत्यांना आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना अत्यंत काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला होता.

बुधवारी, चौधरी यांनी नेपाळबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. “ही सर्व काँग्रेसची चूक आहे. काँग्रेसने या देशांना वेगळे ठेवले आहे म्हणून अराजकता आहे. जर आज नेपाळ भारताचा भाग असता तर नेपाळमध्ये शांतता आणि आनंद असता,” असे बिहारचे उपमुख्यमंत्री म्हणाले होते. भाजपच्या एका खासदाराने ‘द प्रिंट’ला सांगितले की, हे निर्देश महत्त्वाचे आहेत, कारण नेपाळ हा एक “संवेदनशील” मुद्दा आहे आणि बेजबाबदार विधानांचे गंभीर परिणाम होऊ शकतात. नेपाळमध्ये आर्थिक विषमता आणि भ्रष्टाचारावर निदर्शने झाली आहेत, ज्याचा शेवट मंगळवारी के.पी. शर्मा ओली यांच्या राजीनाम्यात झाला. काठमांडूमध्ये आता अनिश्चित काळासाठी कर्फ्यू आहे.

एका निवेदनात, भारताने म्हटले आहे, की तो नेपाळमधील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि अनेक तरुणांच्या जीवितहानीबद्दल देश दुःखात आहे. “एक जवळचा मित्र आणि शेजारी म्हणून, आम्हाला आशा आहे, की सर्व संबंधित लोक संयम बाळगतील आणि शांततापूर्ण मार्गाने आणि संवादाद्वारे कोणत्याही समस्या सोडवतील,” असे निवेदनात म्हटले आहे.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments