scorecardresearch
Tuesday, 7 April, 2026
घरराजकारण

राजकारण

उदयनिधी यांच्या ‘संस्कृत ही मृत भाषा’ या विधानावरून भाजपचा हल्लाबोल

चेन्नई येथे एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी संस्कृतला 'मृत भाषा' असे संबोधले होते, त्यावर भाजप आणि काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रवींद्र चव्हाण आक्रमक, महायुतीच्या अस्थिरतेत वाढ?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यात तणाव वाढत असताना, अस्थिर महायुतीमध्ये एक नवीन वाद निर्माण होत आहे. अंतर्गत सूत्रांच्या मते, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यात पक्षाचा विस्तार करण्यासाठी महाराष्ट्राचे पक्षप्रमुख रवींद्र चव्हाण यांना मान्यता दिली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत तीन दिवसांच्या इम्फाळ दौऱ्यावर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत आज उशिरा इम्फाळला जाणार आहेत. मे 2023 मध्ये मणिपूरमध्ये वांशिक संघर्ष सुरू झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच राज्य दौरा आहे.

निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ 272 प्रतिष्ठित भारतीयांचे राहुल गांधींना खुले पत्र

न्यायाधीश, निवृत्त नागरी कर्मचारी आणि राजनयिक आणि निवृत्त सशस्त्र दल अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या प्रतिष्ठित नागरिकांच्या गटाने काँग्रेस आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर न्यायव्यवस्था आणि सशस्त्र दलांना लक्ष्य केल्यानंतर निवडणूक आयोगासारख्या संस्थांना कलंकित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

‘निवडणूक आयोग व एनडीएच्या संगनमतामुळे बिहारमध्ये काँग्रेस पराभूत’: तारिक अन्वर

बिहार विधानसभा निवडणुकीत इंडिया ब्लॉकच्या दारुण पराभवाचे कारण निवडणूक आयोग आणि सत्ताधारी एनडीए यांच्यातील संगनमत असल्याचे काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी सांगितले आहे

एकनाथ शिंदे वगळता शिवसेनेचे सर्व मंत्री मंत्रिमंडळ बैठकीला अनुउपस्थित

महाराष्ट्रात स्थानिक निवडणुकांपूर्वी राजकारण तापत असताना, सत्ताधारी महायुतीमध्ये नवीन दरी निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे सर्व मंत्री मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीपासून अलिप्त राहिले.

जन-सुराज पक्षाचा एकही जागा न जिंकता बिहार निवडणूक निकालावर प्रभाव

नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही, परंतु त्यांनी त्यांच्या अंतिम मतांपेक्षा जास्त जागा जिंकल्या. त्यांना 3.3 टक्के मते मिळाली, त्यांच्या 238 उमेदवारांपैकी 236 उमेदवारांनी डिपॉझिट गमावले.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार

बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीत काँग्रेस एकट्याने लढणार अशी चर्चा अनेक आठवड्यांपासून सुरू होती. बिहारमध्ये पक्षाच्या पराभवानंतर पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला आणि मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनीही ही घोषणा केली.

दादरा, दमण निवडणुकांनंतर काँग्रेसचा भाजपवर ‘निवडणूक चोरी’चा आरोप

दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) मोठ्या यशादरम्यान, काँग्रेसने भाजपवर निवडणूक चोरीचा आरोप केला आहे. 80% काँग्रेस उमेदवारांचे अर्ज तसेच अनेक अपक्ष उमेदवारांचे अर्ज छाननीच्या टप्प्यावर नाकारण्यात आले आहेत.

अण्णाद्रमुकची व्होटबँक असलेल्या थेवरची द्रमुककडे वाटचाल?

दक्षिण तामिळनाडूमध्ये, जिथे जात आणि राजकारण मीठ आणि पाण्यासारखे मिसळते, तेथे यावर्षी पसुम्पोन येथे होणारी थेवर गुरुपूजा ही केवळ श्रद्धेखातर केली गेलेली नव्हती, तर  ते एक शक्तीप्रदर्शन होते.

केरळ भाजप मुस्लीम घरांना प्रत्यक्ष भेट देऊन करणार प्रचार

दोन महत्त्वाच्या निवडणुका जवळ आल्या असताना, केरळ भाजप युनिटने शुक्रवारी केरळमध्ये मोठ्या प्रमाणात 'मुस्लिम आउटरिच' कार्यक्रमाची घोषणा केली. केरळ भाजप अध्यक्ष राजीव चंद्रशेखर म्हणाले की, या कार्यक्रमाचे नेतृत्व पक्षाचे मुस्लिम सदस्य करतील, ज्यात उपाध्यक्ष डॉ. एम. अब्दुल सलाम आणि समुदायातील इतर सदस्यांचा समावेश आहे.

केरळ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी काँग्रेसचा प्रचार सुरू

केरळमध्ये जवळजवळ एक दशकापासून विरोधी पक्षात असलेल्या राज्य काँग्रेस युनिटने राजधानी तिरुवनंतपुरमसह अनेक शहरांमध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तारखा जाहीर होण्यापूर्वीच प्रचार सुरू केला आहे.