महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि काँग्रेसमधील दरी वाढत चालली आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) नेते विरोधी अजित पवार गटात विलीन होण्यास उत्सुक आहेत, त्यामुळे महाविकास आघाडी फुटण्याच्या मार्गावर आहे.
बारापैकी आठ जिल्हा परिषदा आणि 125 पैकी 51 पंचायत समिती निवडणुकीत आघाडी घेत, भाजप महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष राहिला आहे, ज्यामुळे हे स्पष्ट होते, की पक्ष केवळ शहरी भागातच नाही तर ग्रामीण महाराष्ट्रातही तितकाच मजबूत आहे.
केरळमधील आगामी निवडणुकांसाठी आपल्या प्रचाराला सुरुवात करताना, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफने सत्ताधारी सीपीआय(एम) पक्षावर 'मतांसाठी जातीय ध्रुवीकरण करण्याकरिता संघ परिवाराच्याच मार्गावर चालत असल्याबद्दल' जोरदार टीका केली.
भारतीय जनता पक्षाने शनिवारी, घाटकोपरच्या तीन वेळा नगरसेविका राहिलेल्या रितू तावडे यांना मुंबईच्या महापौरपदासाठी आपल्या उमेदवार म्हणून घोषित केले आहे. यामुळे चार दशकांहून अधिक काळानंतर शहराच्या महानगरपालिकेत आपला दुसरा महापौर बसवण्याची संधी पक्षाला मिळाली आहे.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर का दिले नाही, यावर स्पष्टीकरण देताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुरुवारी सांगितले की, 'देशाच्या लोकशाही परंपरेला बाधा पोहोचवणारी 'अप्रिय' घटना घडण्याची भीती असल्याने त्यांनी पंतप्रधानांना त्यांचे प्रथागत भाषण टाळण्याची विनंती केली होती'.
विरोधकांवर, विशेषतः काँग्रेसवर, 'आपल्याला मृत पाहण्याची इच्छा असल्याचा' आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले की, ‘मोदी तेरी कब्र खुदेगी’ ही केवळ एक घोषणा नाही, तर ते त्यांच्या मनात माझ्याबद्दल असलेल्या दीर्घद्वेषाचे प्रतीक आहे'.
बासष्टवर्षीय मेईतेई भाजप आमदार युम्नाम खेमचंद सिंग, हे मणिपूरचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. मणिपूर राज्य सध्या एका आव्हानात्मक टप्प्यातून जात आहे. 2024 च्या मध्यावर, मणिपूर हिंसाचाराने पेटले होते, तेव्हा खेमचंद यांनी एका बैठकीत एन. बिरेन सिंह यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्यास सांगितले होते.
सुनेत्रा पवार यांनी त्यांचे पती अजित पवार यांच्या जागी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तीन दिवसांनी, महाराष्ट्र सरकारने त्यांची पुणे आणि बीड जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती केली आहे. अजितदादा या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री होते.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान, 'आप'चे खासदार संजय सिंह यांनी 'एपस्टाईन फाइल्स'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आल्याबद्दल सत्ताधारी पक्षाकडून स्पष्टीकरण मागितल्यानंतर सोमवारी दुपारी राज्यसभेत तणाव निर्माण झाला.
निवडणुका तीन महिन्यांवर असताना, बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोग मतदारांना लक्ष्य करण्यासाठी मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेचा वापर करत असल्याचा आरोप केला. ममता यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांवर पक्षपाताचा आणि अपमानाचा आरोप केल्यानंतर बैठक निष्फळ ठरली.
राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) सुनेत्रा पवार यांची एकमताने विधिमंडळ नेतेपदी निवड केली, ज्यामुळे त्यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचा मार्ग मोकळा झाला. शरद पवार म्हणाले की, या निर्णयाबद्दल त्यांना विचारण्यात आले नव्हते, किंवा माहितीही देण्यात आली नव्हती.
नवी दिल्ली: "सर्व काही ठीक आहे." या शब्दांत, हसऱ्या चेहऱ्याने शशी थरूर गुरुवारी संसद भवनात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल...