scorecardresearch
Thursday, 11 June, 2026
घरराजकारण

राजकारण

‘नेपाळवर कोणतेही भाष्य नको’: भाजपचे सर्व नेत्यांना निर्देश

भारतीय जनता पक्षाने (भाजप) नेपाळमधील चालू घडामोडींवर भाष्य करणे टाळण्याचे निर्देश त्यांच्या सर्व नेत्यांना, मंत्र्यांना व सोशल मीडिया हँडल्सना दिले आहेत.

राजस्थानचे धर्मांतरविरोधी विधेयक मंजूर

राजस्थान बेकायदेशीर धर्मांतर प्रतिबंधक विधेयक, 2025 मध्ये जबरदस्तीने आणि बनावट धर्मांतर रोखण्यासाठी कठोर कलमे आणि जन्मठेपेची शिक्षा याची तरतूद आहे. राजस्थान विधानसभेत मंगळवारी मंजूर झालेल्या विधेयकानुसार, वडिलोपार्जित धर्मात परत जाणे धर्मांतराच्या व्याख्येत समाविष्ट नाही.

केरळमधील नन्सच्या अटकेनंतर भाजपचे ख्रिश्चन समुदायात प्रचारवाढीचे प्रयत्न

छत्तीसगडमध्ये गेल्या महिन्यात दोन कॅथोलिक नन्सना अटक झाल्यानंतर, भारतीय जनता पक्षाने केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ख्रिश्चन समुदायाशी संपर्क वाढवला आहे. भाजप नेत्यांच्या मते, पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर ख्रिश्चन समुदायात घरोघरी जाऊन प्रचार सुरू केला आहे.

उपराष्ट्रपतीपदावर ‘एनडीए’चे सी.पी. राधाकृष्णन

महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन मंगळवारी भारताचे 15 वे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले. त्यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार न्यायमूर्ती (निवृत्त) बी. सुदर्शन रेड्डी यांचा 152 मतांनी पराभव केला.

खासदार अशोक सिद्धार्थ जाहीर माफीनंतर पुन्हा ‘बसप’मध्ये सामील

बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) प्रमुख मायावती यांनी माजी खासदार आणि त्यांचे पुतणे आकाश आनंद यांचे सासरे अशोक सिद्धार्थ यांना पक्षात पुन्हा सामील केले आहे. त्यांनी जाहीर माफी मागितल्यानंतर काही तासांतच हे घडले.

केंद्रीय मंत्री कुमारस्वामी व कर्नाटक भाजपप्रमुख विजयेंद्र यांचा खर्गेंवर निशाणा

केंद्रीय मंत्री कुमारस्वामी आणि कर्नाटक भाजपचे प्रमुख विजयेंद्र यांनी काँग्रेस अध्यक्षांवर निशाणा साधला, खर्गे यांनी शेतकऱ्याचा अपमान केला आहे आणि त्यांचे वर्तन काँग्रेसच्या ‘पारंपारिक अहंकाराचा’ पुरावा आहे असे म्हटले.

कर्नाटकच्या वरिष्ठ सभागृहात काँग्रेसचे आणखी चार विधान परिषद सदस्य

डॉ. आरती कृष्णा यांना 'हायकमांड उमेदवार' मानले जात आहे, असे या घडामोडींबद्दल माहिती असलेल्यांनी सांगितले. इतर नामांकित सदस्यांमध्ये एफ.एच. जक्कप्पनवर, शिवकुमार.के आणि रमेश बाबू यांचा समावेश आहे.

जरांगेंच्या मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्रबिंदू ‘हैदराबाद गॅझेट’ नेमके काय?

महाराष्ट्र सरकारने हैदराबाद राजपत्र लागू करण्यासह बहुतेक मागण्या मान्य केल्यानंतर मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी मंगळवारी आझाद मैदानावर आपले आंदोलन संपवले. सरकारने त्यांना आश्वासन दिले, की ज्या मराठ्यांची वंशावळ हैदराबाद राजपत्राद्वारे स्थापित केली जाऊ शकते त्यांना ते कुणबी जातीचे असल्याचे प्रमाणपत्र मिळेल.

जरांगे यांचे उपोषण अखेर मागे

29 ऑगस्टपासून मुंबईच्या आझाद मैदानात उपोषणाला बसलेले मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी मंगळवारी पाचव्या दिवशी उपोषण सोडले आणि महाराष्ट्र सरकारने त्यांच्या आठ प्रमुख मागण्यांपैकी सहा मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी विजयाची घोषणा केली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षण आंदोलनापासून अलिप्त?

मंगळवारी आझाद मैदानावरील उपोषण पाचव्या दिवशी सुरू असताना, मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांचा त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार अधिकच दृढ होताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे वगळता सत्ताधारी महायुतीच्या अनेक नेत्यांनी, विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्यांनी संपूर्ण आंदोलनावर काही ना काही भाष्य केले आहे.

बिहारमध्ये जागावाटप चर्चेसाठी राजद व काँग्रेसची संमती

मत चोरीचा आरोप हा मतदार अधिकार यात्रेचा विषय असला तरी, काँग्रेस कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याच्या भूमिकेने विरोधी आघाडीसाठी एक नवीन आव्हान उभे केले आहे.

जगन मोहन रेड्डींच्या वायएसआरसीपीचा सी.पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा

आंध्र प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआरसीपीने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या आवाहनानंतर एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.