तेलुगू देसम पक्ष (टीडीपी) ने आपले पक्ष सदस्यत्व अभियान संपवल्यानंतर आता मित्रपक्ष जन सेना पक्ष (जेएसपी) स्वतःचे सदस्यत्व अभियान सुरू करण्याची तयारी करत आहे. जेएसपीच्या सूत्रांनी सांगितले की, प्रस्तावात असे म्हटले आहे, की नवीन सदस्यांना अपघात विमा आणि इतर अनेक फायदे मिळतील.
उद्योगपती अनिल अंबानी यांनी सर्वोच्च न्यायालयात एक शपथपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे, की ते न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय देश सोडणार नाहीत आणि त्यांच्या रिलायन्स ग्रुपच्या कंपन्यांशी संबंधित कथित बँक कर्ज फसवणुकीच्या चौकशीत सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) सुरू असलेल्या चौकशीला पूर्ण सहकार्य करतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'ला आपल्या भाषणाने सुरुवात केली. 'जागतिक एआय दिग्गजांच्या मेळाव्यातून मिळणारे निकाल प्रगतीशील, नाविन्यपूर्ण आणि संधीपूर्ण भविष्य घडवण्यास मदत करतील' असे प्रतिपादन त्यांनी केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाल्यानंतर तेरा दिवसांनी, त्यांचे पुतणे रोहित पवार यांनी सार्वजनिकरित्या चार्टर एअरक्राफ्ट ऑपरेटर व्हीएसआर एव्हिएशनवर गंभीर आरोप केले आहेत.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि काँग्रेसमधील दरी वाढत चालली आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) नेते विरोधी अजित पवार गटात विलीन होण्यास उत्सुक आहेत, त्यामुळे महाविकास आघाडी फुटण्याच्या मार्गावर आहे.
माजी लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांचे आत्मचरित्र, ज्याचा उल्लेख गेल्या आठवड्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत केला होता, ते प्रकाशित झालेले नाही, असे प्रकाशक पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने (पीआरएचआय) काल, सोमवारी स्पष्ट केले.
1974 च्या बॅचचे हिमाचल प्रदेश कॅडरचे अधिकारी असलेले निवृत्त आयपीएस अधिकारी अजित लाल हे गृहमंत्रालयाचे ईशान्य प्रांतासाठीचे सल्लागार म्हणून पदभार स्वीकारतील. ए.के. मिश्रा यांचा कार्यकाळ गेल्या आठवड्यात संपला होता, असे दोन वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी 'द प्रिंट'ला सांगितले.
गेल्यावर्षी ग्रेनेडसह अटक करण्यात आलेल्या एका दहशतवादी संशयिताची 8 आणि 9 फेब्रुवारीच्या मध्यरात्री फरिदाबाद जिल्हा कारागृहात त्याच्याच कोठडीतील साथीदाराने हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथे तीन अल्पवयीन मुलींनी एका निवासी इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. त्यांच्या पालकांनी त्यांना ऑनलाइन गेम्स खेळण्यापासून रोखल्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय आहे.
मणिपूर विधानसभेत भाजपचे बहुमत आहे. गेल्या काही महिन्यांपासून पक्षाच्या आमदारांसोबतच, मित्रपक्ष एनपीपी आणि एनपीएफच्या नेत्यांसोबतही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने अनेक बैठका घेतल्या आहेत.
अपघाताच्या ठिकाणाजवळ राहणाऱ्या कमला कैलाश अटले सांगतात, “आम्ही आमची कामे करत असताना आम्हाला एक मोठा आवाज ऐकू आला. जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो, तेव्हा आम्हाला माहीत नव्हते, की दादा (अजित पवार) त्यांच्यामध्ये होते.”
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली म्हणून राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला. त्यांनी अजित पवार यांचा उल्लेख 'चांगला मित्र' आणि 'जनतेचा महान नेता' असा केला.