scorecardresearch
Thursday, 20 August, 2026
घरराजकारण

राजकारण

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची पोलंडचे उपपंतप्रधान सिकोरस्की यांच्याशी भेट

पोलंडचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री राडोस्लाव सिकोरस्की यांनी सोमवारी पाकिस्तानमधून होणाऱ्या सीमापार दहशतवादाबाबत भारताच्या आव्हानांची तुलना युक्रेनमधील रशियाच्या सध्याच्या युद्धाशी केली, आणि दोन्ही मुद्द्यांवर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी मनमोकळी चर्चा झाल्याचे सांगितले.

तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी यांचा पुन्हा सभात्याग

तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी यांनी 'राष्ट्रगीताचा अपमान' झाल्याचे कारण देत, तिसऱ्यांदा राज्य विधानसभेतून सभात्याग केला. यामुळे द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) नेतृत्वाखालील सरकारसोबत नवा वाद निर्माण झाला आहे.

‘सेना विरुद्ध सेना’ लढतीत स्पष्ट विजेता नाही, मुंबईत ठाकरे, तर ठाण्यात शिंदे गट वरचढ

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासाठी ही 'करो या मरो' अशी निवडणूक होती, पण मतदारांकडून पक्षाला कोणताही स्पष्ट कौल मिळालेला नाही.

पालिका निवडणुकांनंतर भाजपसोबत सत्तावाटपासाठी शिंदेंचा संघर्ष?

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) निवडणुकीनंतर मुंबईत किंगमेकर म्हणून उदयास आलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे केवळ बीएमसीमध्येच नव्हे, तर मुंबई महानगर प्रदेशातील इतर महापालिकांमध्येही सत्तावाटपासाठी जोरदार वाटाघाटी करण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपची 90 जागांवर आघाडी, शिवसेना (उबाठा) दुसऱ्या स्थानावर

भूमिपुत्रांवर लक्ष केंद्रित करून ठाकरे गटाने जोरदार प्रचार मोहीम राबवली असूनही, भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मोठी आघाडी घेतली, ज्यात भाजप शहरात नंबर एकचा पक्ष म्हणून उदयास आला.

मध्यप्रदेशचे मोहन यादव सरकार व आरएसएसमधील मतभेद उघड

भोपाळ साहित्य महोत्सवावरून निर्माण झालेल्या वादामुळे मोहन यादव यांच्या नेतृत्वाखालील मध्यप्रदेश सरकार आणि संघ परिवार यांच्यात मतभेद समोर आले आहेत. पोलिसांनी संभाव्य निदर्शनांचा इशारा दिल्यानंतर भोपाळ साहित्य महोत्सवाला मुघल सम्राट बाबरवरील एका नवीन पुस्तकावरील नियोजित चर्चा रद्द करावी लागली.

मुंबई महापालिका निवडणुकीत मार्कर पेनचा वापर, मतदार व विरोधकांची तक्रार

महाराष्ट्रात गुरुवारी 29 महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू असताना, विशेषतः मुंबईत, मतदान प्रक्रियेदरम्यान पुसल्या जाणाऱ्या शाईचे मार्कर पेन वापरल्याबद्दल राज्य निवडणूक आयोगाविरुद्ध (एसईसी) तक्रारी आल्या आहेत.

‘उत्तर भारतीय महिलांना चूल- मूल यातच बांधून ठेवले जाते’ या विधानामुळे ‘डीएमके’चे मारन वादाच्या भोवऱ्यात

द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) चे खासदार दयानिधी मारन यांनी असा दावा केला आहे, की 'उत्तर भारतीय महिलांना स्वयंपाकघरात काम करण्यास आणि मुलांना जन्म देण्यास सांगितले जाते, व त्यांना काम करू दिले जात नाही. तर तामिळनाडूतील महिलांना शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करण्यास प्रोत्साहन दिले जाते'.

पिनरई विजयन सरकारकडून के. एम. मणी स्मारक प्रकल्पासाठी जमीन राखीव

पिनरई विजयन सरकारने बुधवारी पक्षाचे दिवंगत संस्थापक के. एम. मणी यांच्या स्मारक प्रकल्पासाठी जमीन राखून ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. एलडीएफ सरकारने राज्य राजधानी तिरुवनंतपुरममधील कौडियार येथे के. एम. मणी फाउंडेशनला 'के. एम. मणी इन्स्टिट्यूट फॉर सोशल ट्रान्सफॉर्मेशन' स्थापन करण्यासाठी 30 वर्षांच्या कालावधीसाठी जमीन भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे.

‘मराठी माणूस’ ते ‘अदानीस्तान’ : राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रचारातील 5 महत्त्वाचे मुद्दे

आठवडाभर चाललेल्या शाब्दिक युद्धानंतर, बदलत्या आघाड्या आणि ठाकरे वारशावरील दाव्यानंतर, महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांसाठीचा प्रचार मंगळवारी संपुष्टात आला. या अटीतटीच्या प्रचारात, केवळ सत्ताधारी आणि विरोधी आघाड्याच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत नव्हत्या, तर अनेक आघाड्यांमध्ये विविध मुद्द्यांवरून अंतर्गत कलहही दिसून आला.

प्रियांका गांधींच्या वाढदिवसानिमित्त नेत्यांकडून शुभेच्छा, काँग्रेससाठीच्या त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक

काँग्रेसच्या एकमेव, पदभार नसलेल्या सरचिटणीस प्रियांका गांधी वद्रा यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला, अनेक नेत्यांनी पक्ष मजबूत करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक केले.

भाजप व अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेकांविरुद्ध घणाघाती प्रचार

2017 च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये राज्यातील दोन मित्रपक्ष, जे शहरात एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते, त्या भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि अविभाजित शिवसेना यांच्यात तीव्र आणि कटू लढत झाली होती. यावेळी, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील लढतीतही असेच चित्र दिसत आहे.